Tuesday, November 26, 2019

संविधान दिन विशेष माहिती व घोषवाक्ये

संविधान दिन विशेष माहिती



 १५ ऑगस्ट, १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली व एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून व देशाला राज्यकारभार करण्यासाठी एक लिखित राज्यघटनेची आवश्यकता होती. त्यामुळे घटना परिषदेची निर्मिती केली. ९ डिसेंबर, १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक भरली. त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, टी. टी. कृष्णम्माचारी, बी. जी. खेर, राधाकृष्णन, कन्हैयालाल मुन्शी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. आर. जयकर, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सर फिरोजखान, हंसा मेहता, सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख यांचा समावेश होता. ११ डिसेंबर, १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. १३ डिसेंबर, १९४६ रोजी घटना समिती समोर उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्यामध्ये अनेक समित्या निर्माण करण्यात आल्या. त्यात मसुदा समिती ही महत्त्वाची समिती म्हणून ओळखली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अचानक १७ डिसेंबर, १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मत मांडण्यास सांगितले. तेव्हा डॉ. आंबेडकर यांच्या भाषणांनी संपूर्ण सभा दणाणून गेली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. विरोधकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ज्या काँग्रेस पक्षाचा डॉ. आंबेडकरांना विरोध होता, त्याच काँग्रेस पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसमोर, ज्ञानासमोर झुकावे लागले. त्यांच्या ऐतिहासिक भाषणाने प्रत्येक नेत्याने गौरवोद्गार काढले.

१५ ऑगस्ट , १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते स्वीकारले. भारत देशाचे पहिले कायदामंत्री झाले.

घटना मसुदा समितीमध्ये सात नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेची संपूर्ण जबाबदारी या समितीवर होती.
१) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर,
२) एन. गोपालस्वामी अय्यंगार,
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
४) के. एम. मुन्शी,
५) सय्यद मोहमद सादुल्लाह,
६) बी. एल. मित्तर,
७) डी. पी. खैतान.
       
            अशाप्रकारे या सात दिग्गज नेत्यांचा घटना मसुदा समितीमध्ये समावेश करण्यात आला होता. यापैकी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोडून इतर सर्व नेत्यांनी काही कारणे सांगून त्यातून बाहेर पडले. तेव्हा भारतीय राज्यघटनेची संपूर्ण जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न घाबरता, न डगमगता भारतीय राज्यघटना पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
               २९ ऑगस्ट, १९४७ पासून मसुदा समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली. समितीचे काम १६५ दिवस चालले. त्यावर विचारविनिमय झाला. १३ फेब्रुवारी, १९४८ रोजी घटना समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. त्यावेळी ७६३५ दुरूस्त्या करण्यास सांगितल्या. त्यापैकी २९७३ दुरूस्त्या मान्य करण्यात आल्या. घटनानिर्मितीसाठी ६३ लाख ७२९ रू. इतका खर्च करण्यात आला होता. त्यामध्ये ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती.

            भारतीय राज्यघटनेमध्ये डॉ. आंबेडकरांच्या विचारांची व्यापकता, कल्पकता, कायदेतज्ज्ञ, विद्वान पंडित, अनुभवी, राज्यशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व भविष्याचा वेध घेऊन चौकस दूरदृष्टी दिसून येते. करीता, तळागाळातील लोकांचा विचार समोर ठेवून सर्वांना समान अधिकार व मूलभूत हक्क या संविधानातून दिलेले दिसून येतात.

कलम १७ मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे,
कलम १४ - व्यक्तीला कायद्यापुढे समानता
अर्थात कलम १४ ते १८ यामध्ये समानतेचा हक्क,
कलम १९ ते २२ स्वातंत्र्याचा हक्क,
कलम २५ ते २८ धर्मस्वातंत्र्याचा हक्क,
कलम २९ व ३० शैक्षणिक हक्क,
न्यायालयात दाद मागण्यासाठी कलम १२४ नुसार सर्वोच्च न्यायालय,
२१४ नुसार उच्च न्यायालय,
कलम ३३० - अनुसूचित जाती-जनजाती यांच्यासाठी राखीव जागा व
कलम ३३५ नुसार अनुसूचित जाती-जमाती यांचे हक्क

               अशाप्रकारे भारतीय नागरिकांस हक्क व अधिकार देऊन देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी योगदान ठरते. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांचा पुरस्कार करणारे व समाजवाद, धर्मनिरपेक्ष, सार्वभौमत्व, लोकशाही या तत्त्वांवर आधारीत भारतीय राज्यघटना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी अर्पण केली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्णपणे सिंहाचा वाटा व महत्त्वाचे योगदान होते आणि त्यांनी ते अथक परिश्रमाने, जोमाने व प्रभावीपणे जोपासले. म्हणून डॉ. आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणतात. २६ जानेवारी, १९५० पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली. २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.

महामानव, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !!!



संविधान दिनसंविधान दिन घोषवाक्ये


-
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील.
घोषवाक्य , घोषणा !

१. जब तक सूरज चाँद
 तब तक संविधान

२. विवेक पसरवू जनाजनात
 संविधान जागवू मनामनात

३. समता, बंधुता, लोकशाही
 संविधानाशिवाय पर्याय नाही

४. कर्तव्य, हक्कांचे भान
 मिळवून देते संविधान

५. संविधान एक परिभाषा है
 मानवता की आशा है

६. संविधानावर निष्ठा
 हीच व्यक्तीची प्रतिष्ठा

७. संविधानाची मोठी शक्ती
 देई आम्हा अभिव्यक्ती

८. मिळून सारे देऊ ग्वाही
 सक्षम बनवू लोकशाही

९. संविधानाची कास धरू
 विषमता नष्ट करू

१०. सर्वांचा निर्धार
 संविधानाचा स्वीकार

११. संधीची समानता
 संविधानाची महानता

१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

१३. संविधान आहे महान
 सर्वांना हक्क समान

१४. लोकशाही गणराज्य घडवू
 संविधानाचे भान जागवू

१५. संविधानाचा सन्मान
 हाच आमचा अभिमान

१६. भारत माझी माऊली
 संविधान त्याची सावली

१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
 हाच संविधानाचा मूलमंत्र

१८. नको ताई घाबरू
 चल संविधान राबवू

१९. जर हवी असेल समता
 तर मनात जागवू बंधुता

२०. सबसे प्यारा
 संविधान हमारा

२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है

२२. संविधानाची महानता
 विविधतेत एकता

२३. देशभरमे एकही नाम
 संविधान! संविधान!

२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची

२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
 संविधान हमारा सबसे प्यारा

२६. लोकशाहीचा जागर
 संविधानाचा आदर

२७. तुमचा आमचा एकच विचार
 संविधानाचा करू प्रचार

२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
 ये देश चलता है संविधान से!

२९) दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता

३०) समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची

३१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय

३२) संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती

३३) संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी

३४) ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो

३५) जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू

३६) संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे

३७) संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान

३८) संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

३९) संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत

४०) घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे

४१) अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा

४२) भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान

४३) स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता

४४) वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी

४५) बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान

४६) लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान

४७) भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !

४८) समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या

४९) सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान

५०) संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण

५१) आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार

५२) संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार

५३) हक्क बजावू, कर्तव्य पाळू
 प्राणपणाने संविधान सांभाळू

५४) संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही

५५) नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही

५६) भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान ! घोषवाक्ये
-
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील.
घोषवाक्य , घोषणा !

१. जब तक सूरज चाँद
 तब तक संविधान

२. विवेक पसरवू जनाजनात
 संविधान जागवू मनामनात

३. समता, बंधुता, लोकशाही
 संविधानाशिवाय पर्याय नाही

४. कर्तव्य, हक्कांचे भान
 मिळवून देते संविधान

५. संविधान एक परिभाषा है
 मानवता की आशा है

६. संविधानावर निष्ठा
 हीच व्यक्तीची प्रतिष्ठा

७. संविधानाची मोठी शक्ती
 देई आम्हा अभिव्यक्ती

८. मिळून सारे देऊ ग्वाही
 सक्षम बनवू लोकशाही

९. संविधानाची कास धरू
 विषमता नष्ट करू

१०. सर्वांचा निर्धार
 संविधानाचा स्वीकार

११. संधीची समानता
 संविधानाची महानता

१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

१३. संविधान आहे महान
 सर्वांना हक्क समान

१४. लोकशाही गणराज्य घडवू
 संविधानाचे भान जागवू

१५. संविधानाचा सन्मान
 हाच आमचा अभिमान

१६. भारत माझी माऊली
 संविधान त्याची सावली

१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
 हाच संविधानाचा मूलमंत्र

१८. नको ताई घाबरू
 चल संविधान राबवू

१९. जर हवी असेल समता
 तर मनात जागवू बंधुता

२०. सबसे प्यारा
 संविधान हमारा

२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है

२२. संविधानाची महानता
 विविधतेत एकता

२३. देशभरमे एकही नाम
 संविधान! संविधान!

२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची

२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
 संविधान हमारा सबसे प्यारा

२६. लोकशाहीचा जागर
 संविधानाचा आदर

२७. तुमचा आमचा एकच विचार
 संविधानाचा करू प्रचार

२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
 ये देश चलता है संविधान से!

२९) दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता

३०) समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची

३१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय

३२) संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती

३३) संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी

३४) ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो

३५) जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू

३६) संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे

३७) संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान

३८) संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

३९) संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत

४०) घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे

४१) अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा

४२) भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान

४३) स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता

४४) वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी

४५) बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान

४६) लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान

४७) भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !

४८) समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या

४९) सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान

५०) संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण

५१) आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार

५२) संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार

५३) हक्क बजावू, कर्तव्य पाळू
 प्राणपणाने संविधान सांभाळू

५४) संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही

५५) नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही

५६) भारताचे एकच विधान,

संविधान ! संविधान !

Thursday, November 7, 2019

आनंददायी शैक्षणिक सत्राची सुरूवात शाळा रहाटाडवाडी

आनंददायी शैक्षणिक सत्राची सुरूवात



आज रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी दिवाळीत दिलेल्या दिवाळी अभ्यासाचे संकलन करून घेण्यात आले.
         सर्व इयत्तेतील सर्व मुलांनी दिलेला अभ्यास संपूर्ण आठवणीने सोडवला व आठवणीने पहिल्या दिवशी घेऊन आले म्हणून सर्व मुलांचे अभिनंदन करण्यात आले.
       
         त्यानंतर मुलांनी दिवाळीत खाल्लेले खमखमीत पदार्थ (चिवडा,लाडू,करंज्या, शंकरपाळे, गुलाबजामून इ.) तसेच उडवलेले फटाके व फटाके उडविण्यात आलेला आनंद सांगितला.
       
       त्यानंतर प्रत्येक मुलांनी दिवाळीत केलेल्या धमाल मस्ती गंमती जमती, खेळलेले खेळ, फिरायला गेलेली गावे, गावातील नवे मित्र नवे खेळ व नव्या आठवणी, शहरात, मुंबईत पाहिलेल्या नवीन गोष्टी, कोणी बाग पाहिली, कोणी प्राणीसंग्रहालय तर कोणी Dmart पाहिला. अशा अनेक गोष्टी अनेक अनुभव घेऊन पहिल्या दिवशी मुले शाळेत दाखल झाली व प्रत्येक जण आपले अनुभव सांगण्यास उत्सुक होता.

      अशा पध्दतीने शाळेच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नवनवीन अनुभवानी आनंददायी पध्दतीने झाली.

    मुख्याध्यापक                   सहशिक्षक
श्री संजय पोपट पालवे     श्री. प्रमोद दिगंबर मोरे
9028391726               9404566070