तळा तालुक्याची आठवणींची शिदोरी
पाऊस आणि आठवण या दोघांचं घट्ट नातं आहे,
फरक फक्त एवढाच आहे की पाऊस शरीराला भिजवतो
तर आठवण मनाला भिजवते....
आज दिनांक 23/07/2024रोजी शाळा रहाटाडवाडी व तालुका तळा येथून कार्यमुक्त होऊन रोहा तालुका येथे रुजू होण्यासाठी जात आहे. पण जाताना तळा तालुक्यातील असंख्य आठवणींचा संचय घेऊन जात आहे त्याचबरोबर तळा तालुक्याने मला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. तळा तालुक्यातील ज्या ज्या गावाशी गावातील लोकांशी माझा संपर्क आला अशा सर्व लोकांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. वेळोवेळी गरज पडेल त्या ठिकाणी मदतीला धावून आले मग त्यामध्ये सर्वप्रथम माझ्या सेवेची सुरुवात झाली ती 31 डिसेंबर 2008 चरई बुद्रुक या ठिकाणाहून चरईच्या शाळेने व गावाने मला दिलेले प्रेम माया ममता ही मी कधीही विसरू शकणार नाही. चरईचे ग्रामस्थ अतिशय मनमिळावू समजून व हवी ती मदत करणारे असे गावकरी पुन्हा मिळणे नाही. चरई शाळेतील माझे 3 विद्यार्थी नवोदय पात्र झाले.चरईच्या गावामध्ये माझ्या सेवेची सुरुवात झाली आणि त्या गावाने मला आपल्या गावातील मुलाप्रमाणे अकरा वर्ष सांभाळले.नारायण आण्णा,आत्या, दिलीप बुवा, विठोबा काप,नामदेव काप,दिनेश काप,लक्ष्मण काप बाबा,राजेश काप, नरेंद्र शेपोंडे, सटुराम शेपोंडे, कै.योगेश पतारे, आदेश तांबे, हिराचंद तांबे साहेब,लक्ष्मण तांबे, तांबे बाई, पतारे बाई, राजू पांचाळ,जितेंद्र पांचाळ, विठ्ठल पतारे,भगवान खांबळ, अनिलभाई काप,सुरेश गंभीर,दशरथ जाईलकर,शेपोंडे बाबा,प्रताप पतारे,महेश काप,सचिन पात्रे,सुचित पतारे इत्यादी सर्वांचा त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील.
त्यानंतर रहाटाडवाडी या गावांमध्ये नाही पाच वर्षाची सेवा झाली. याही गावातील ग्रामस्थ मला चरई बुद्रुक ग्रामस्थाप्रमाणेच मनमिळावू सहकार्यशील प्रेमळ अशी जीवाभावाची माणसं मिळाली त्यामुळे हे पाच वर्ष कशी निघून गेली हे कळालेही नाही.मनवल गुरूजी,प्रकाश खेडेकर,जितेंद्र खेडेकर,केशव सुर्वे,मोरेश्वरी मनवल,खेरटकर बाबा,गायकर मामा यशवंत पवार, पंदेरे बाई, विद्याबाई, अमृताबाई,वाघमारे बाई, अध्यक्ष गंधाश्री कातुर्डे,अनंत मनवल, विठोबा धुमाळ, यशवंत पवार, धनगरवाडीतील लीला शिंगाडे,तुकाराम ढेबे, सुरेखा ढेबे, सुरेश ढेबे, केशव ढेबे, मनीषा शिंगाडे, मनोहर ढेबे, इत्यादी च्या सहकार्याने रहाटाडवाडी शाळेने देखील मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.
त्यानंतर एक वर्ष मागील एक वर्ष रहाटाड या गावांमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी देखील मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला व तुर्त कामगिरीवर असताना देखील त्या ठिकाणी माझ्या वर्गातील एक विद्यार्थिनी नवोदय विद्यालयाला लागली याचा मला आनंद आहे.
या 15 वर्षाच्या काळात मला मुख्याध्यापक म्हणून सर्वप्रथम श्री सुरेश राठोड सर यांची साथ लाभली त्यांनी मला आपल्या लहान भावाप्रमाणे समजून घेऊन सहकार्य केलं त्यानंतर श्री धनंजय पवार सर हे मुख्याध्यापक म्हणून आले त्यांनीही चरई बुद्रुक शाळा डिजिटल करण्यामध्ये मला मोलाचे सहकार्य केले त्यानंतर रहाटाडवाडी ठिकाणी श्री संजय पोपट पालवे सर यांचेही खूप सहकार्य व खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या याच काळात रहाटाडवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. त्यानंतर रहाटाड शाळेमध्ये एक वर्ष श्री अशोक ढाकणे सर हेही मला मुख्याध्यापक म्हणून लाभले त्यांनीही मला खूप चांगलं सहकार्य केलं त्यानंतर रहाटाडवाडी शाळेमध्ये श्री रविंद्र म्हात्रे सर यांनी देखील मला अतिशय चांगलं सहकार्य केलं.
या 15 ते 16 वर्षाच्या काळामध्ये तळा तालुक्यातील सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांच्याशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सोळा वर्षाचा काळ कधी निघून गेला हे कळालं नाही खासकरून तळेगाव गावातील ग्रामस्थांनी मला मुलांप्रमाणे सांभाळले. कदमशेठ ,तलार कुटुंब,कुंभार कुटुंब, तळेगावकर कुटुंब, तळेगाव मध्येच जीवाभावाची मित्र मंडळी मिळाली. श्री.झिंगळे सर,श्री.राठोड सर,श्री.बंडगर सर,श्री.सोनटक्के सर,श्री.सुरेवाड सर,श्री.थोरे सर,श्री.वाले सर श्री.भोंडिवले सर श्री.पालवे सर श्री.अनिल मोरे सर यांच्या सहवासात एकामागून एक वर्ष कशी निघून गेली कळली ही नाहीत. ही सर्व मंडळी स्व जिल्ह्यात व सोईच्या ठिकाणी गेली त्यावेळी खूप दुःख झाले पण त्याच वेळी नवे मित्र जोडले गेल्यामुळे दुःख कधी नाही कमी झाले कळलेच नाही.तळा तालुक्यातील इतरही सर्व शिक्षक मंडळीनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यामुळे व येथील लोकांच्या प्रेमळ स्वभावामुळे मला हा तालुका परका कधी वाटला ही नाही. तळा तालुक्यात लाभलेले सर्व अधिकारी वर्ग यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन, नवीन कार्याची प्रेरणा दिली त्याबद्दल सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक आभार. तालुका सोडण्याची इच्छा नव्हती परंतु काही मिळवण्यासाठी काही गोष्टीचा त्याग करावा लागतो म्हणून हा त्याग करण्याची वेळ आली परंतु या 15 वर्षाच्या काळामध्ये माझं कोणाशीही भांडण तंटा वाद झाला नाही हे अतिशय चांगली गोष्ट या पंधरा वर्षाच्या काळात झाली त्याचा मला अतिशय आनंद आहे.
*पण हे दिवस संस्मरणीय होते,आहेत व कायम संस्मरणीय राहतीलच*
*असंख्य व्यक्ती व असंख्य आठवणी आहेत त्या शब्दात मांडत बसलो वेळही कमी पडेल*
*आपले नातेसंबंध व ऋणानुबंध असेच कायम राहतील..*
*माझ्या संपर्कातील प्रत्येकांचा मी मनापासून ऋणी आहे.*